टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलेकला ३-० अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ३१७ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला अवघ्या २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळले. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याआधी शुभमन गिल आणि विराट कोहलीने शतके झळकावली. विराटने नाबाद १६६ धावा केल्या. विराटचे या मालिकेतील दुसरे शतक. या शतकासह विराटने विश्वविक्रम केला आहे.
सचिनचा विश्वविक्रम मोडला
विराटने टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विश्वविक्रम मोडला. विराटचे श्रीलंकेविरुद्धचे शतक हे त्याच्या कारकिर्दीतील ४६ वे शतक होते. श्रीलंकेविरुद्धचे हे १०वे शतक होते. हे भारतातील २१वे शतकही ठरले. विराटने सचिन तेंडुलकरचा भारतात सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही मोडला.
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब, प्रदूषणात मोठी वाढ
गुवाहाटी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या होत्या. विराटने यासह सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये नाबाद १६६ धावा केल्या. हे शतक विराटचे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे, एकदिवसीय क्रिकेटमधील ४६वे आणि भारताचे २१वे एकदिवसीय शतक ठरले. एवढेच नाही तर विराटने श्रीलंकेविरुद्ध १० शतके झळकावली. कोणत्याही संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा हा विक्रम आहे.
महेल जयवर्धने पछाडले होते
या शतकादरम्यान विराटला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत स्थान मिळाले. विराट श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला. विराटच्या नावावर आता १२ हजार ५८८ धावांचा विक्रम आहे.